बंदी घातलेली पुस्तकं..

कुठलिही गोष्ट आपण नेहेमीच एका ठराविक बौध्दीक तराजु मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणुनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच  बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल   वाचण्यात आलं होतं. त्यामुळे ही पुस्तकं वाचायची  इच्छा वाढली होती. थोडी राजकिय , पण बरीचशी श्रुंगारीक पुस्तकं होती बंदी घातलेल्या पुस्तकांमधे .  लेखकांवर अशी पुस्तकं लिहिल्याबद्दल   खटले  चालवुन   लेखकांना अटक पण करण्यात आली होती-  आता, इतकी गाजलेली पुस्तकं, मग त्यामधे काय असेल ही उत्स्तुकता काही शांत बसु देत नव्हती- ती पुस्तकं एकदा तरी वाचलीच पाहिजे अशी इच्छा व्हायची .

नेटवर बहुतेक सगळी पुस्तकं पिडीएफ मधे अव्हेलेबल आहेत- .बंदी घातली गेलेली  पुस्तकं नेट वर शोधली आणि डाउन लोड करुन वाचली- काही पुर्ण वाचली , तर काही नुसती चाळली त्यांचीच थोडी माहिती इथे देतोय. यातली काही पुस्तकं ही अश्लिलतेकडे झुकणारी, किंवा अश्लिल म्हणता येतिल अशी पण आहेत. पुस्तकांचा काळ हा अगदी १७ व्या शतका पासुन तर १९ व्या शतका पर्यंत   आहे. त्या काळी पण असं साहित्य अस्तित्वात होतं हे बघुन खरं तर आश्चर्यच वाटतं.

एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा काही दशकां पुर्वीचा दृष्टीकोन आणि आजचा दृष्टीकोन यामधे जमिन अस्मान चं अंतर आहे. मी लहान असतांना चंद्रकांत काकोडकर हे अश्लिल – चावट लिहिणारे म्हणुन प्रसिध्द होते.ह्यांची शामा ही कादंबरी बरीच गाजली होती. त्या  कादंबरी मधे काय होतं असं?? आजच्या तुलनेत अजिबात काही नव्हतं. थोडं रोमान्सचं वर्णन केलं गेलं होतं. त्या काळात या कादंबरीकडे एक श्रुंगारीक कादंबरी म्हणुन बघितलं जायचं आणि आमच्या सारखे मुलं चोरुन वाचायचे . तेंव्हा नुस्तं नायकाने नायीकेला जवळ घेतलं, आणि तिचं चुंबन घेतलं, इतकं जरी वाचलं तरी  अंगावर शहारुन यायचं   :)   सगळ्यात जास्त इरॉटीक /रोमॅंटीक साहित्य होतं मराठी मधलं. आता नेटवर इतकं जास्त व्हिडिओ आणि अश्लिल फोटो, लेख अव्हेलेबल आहेत, की काकोडकर एकदम फिके वाटतात, आणि त्यांच्यावर का केस केली गेली होती हेच समजत नाही??

काही महिन्यांपुर्वी एक रा.घो. कर्वेंवरचा चित्रपट पाहिला होता टिव्हीवर. त्या मधे दाखवलं आहे, की समाजस्वास्थ्य म्हणुन जे मासिक ते काढायचे त्याला पण एक अश्लिल साहित्य म्हणुन त्यावर खटले भरण्यात आले होते.मराठी साहित्य इतके शुचिर्भुत होते, की सिमारेषेला कधी  किंचितही स्पर्श झाला तरी लोकं अकांड तांडव करायचे. हा चित्रपट अतिशय सुंदर होता. संतती नियमासाठी त्यांनी केलेलं काम उत्कृष्ट रित्या दाखवलं होतं. पदरचे पैसे खर्च करुन ते एक समाजस्वास्थ्य म्हणुन  मासिक चालवायचे. अश्लिलतेच्या कायद्याखाली त्यांच्यावर बरेचदा खटले दाखल करण्यात आले . पैसा नसतांना पण त्यांनी हे मासिक सुरु ठेवलं.

केवळ भारतामधेच नाही तर जगभरात असे अनेक साहित्य प्रकाशित केले गेले आणि त्या साहित्यिकांवर खटले पण चालवले गेले. काही ठिकाणि तर जेल मधे पण जावं लागलं साहित्यिकांना.

लेडी चॅटर्लीज लव्हर हे पुस्तक एवढ्यातच म्हणजे १९६० सालपर्यंत बंदी घातलेलं पुस्तक होतं . या पुस्तकावर १८५७ चा ऑब्सिन पब्लिकेशन ऍक्ट खाली खटला भरण्यात आला होता. या पुस्तका मधे होतं तरी काय?? मी वाचलंय.. अजिबात काहीही आक्षेपहार्य वाटलं नाही मला.प्लॅटोनिक लव्ह वगैरे काही नसतं.प्रेम हे शेवटी   शारिरीक पातळीवरच जाउन पोहोचतं असं लिहिलंय यामधे-.

हे पुस्तक मला तरी अतिशय उत्कटतेने लिहिलेली एका स्त्रीची अतृप्त भावनांची कहाणी वाटली. कॉनी चा नवरा लॉर्ड क्लिफोर्ड… एका युध्दामधे जातो- तो जातो तेंव्हा होणारा सेक्स्युअल भावनांचा कोंडमारा आणि ती वाट पहात असते तो परत येण्याची. तो जेंव्हा परत येतो तेंव्हा व्हिल चेअर वरच बसलेला!!  अजिबात  खालच्या शरिराची हालचाल करता येत नसते त्याला.

कॉनीच्या स्त्रीसुलभ आणि सेक्स्युअल  भावना  या सा्रख्या उफाळून येतात- त्यांची पुर्ती तर व्हायलाच हवी. नवऱ्यावर असलेलं प्रेम, त्याची  ’ती’ असमर्थता, त्यातुन आलेलं वैफल्य आणि त्या मुळे  उद्युक्त होणाऱ्या सेक्स्युअल  भावनांची  दमन करण्याचा प्रयत्न आणी नंतर मग   पुर्ती करण्यासाठी तिने तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर बरोबर केलेली शय्या सोबत -अशी सरळ धोपट कहाणी आहे.  कॉनी ही व्याभीचारी नाही- तिचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे अगदी मनापासुन.. पण , परिस्थिती मुळे  ती  केवळ शरीरसुखा साठी  नवऱ्याच्या मॅने्जर बरोबर  लग्न बाह्य संबंध ठेवते.

जर तिचा नवरा व्हिल चेअर बाउंड झाला नसता, तर ती अशी वागली असती कां?? हा विचार बरेचदा वाचतांना मनात येतो..बऱ्याच लहान लहान प्रसंगातुन अतिशय सुंदर रितिने  तिचा मॅनेजर बरोबरचा रोमान्स रंगवला आहे.  डि एच लॉरेन्स यांचं हे पुस्तक लिहिलेलं हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचायलाच हवं .पुस्तकाची भाषा अप्रतिम आहे  डीएच लॉरेन्सचं पुस्तक  असल्यामुळे !! आता हे पुस्तक म्हणजे श्रुंगारीक कादंबरीतला एक मानदंड ठरावा असे आहे . या पुस्तकातल्या नायिकेचा तिरस्कार करावा की ति्ची किव करावी – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधताच हे पुस्तक संपत. एकदा आवर्जुन वाचा..इथे लिंक दिलेली आहे डाउन लोड करायला.

स्त्री पुरुष संबंधाची ओपनली केली गेलेली वर्णने आपल्या देशात अगदी फार पुरातन काळापासुन चालत आली आहेत. वात्सायनाचे कामसुत्र म्हंटलं की  फक्त ती ऍक्रोबॅटीक आसनंच आठवतात. पण खरंच तसं आहे कां? कामसुत्रा मधे त्या व्यतिरिक्त खुप माहिती दिलेली आहे. आपण फक्त ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेउन आपली मतं बनवतो- काम सुत्र म्हणजे ती चौर्यांशी आसनं इतकंच समजतो आपण पण तसं नाही. हे पुस्तक अतिशय सुंदर रितिने त्या काळातल्या वातावरणामधे वैवाहीक जिवन सुखी कसं असावं याची माहिती देणारं पुस्तक होतं.  ह्या पुस्तकामधे आदर्श वैवाहीक जिवन कसं असावं याची माहिती दिलेली आहे .स्त्री ला काय आवडतं? पुरुषाने कसे वागावे? असे अनेक मुद्दे आहेत दिलेले. दुर्दैवाने आजही इतक्या सुंदर ग्रंथाकडे भारतामधे एक पोर्नोग्राफिक पुस्तक म्हणुन पाहिलं जातं.इथे वाचा ते पुस्तक.

हे पुस्तक खरं तर या विषयावरचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक ठरु शकतं . याच पुस्तकावरुन बेतलेलं एक अरबी पुस्तक पण त्या काळी निघालं होतं त्याचं नाव होतं पर्फ्युम्ड गार्डन.वाचायचं असेल तर इथे आहे ते.. यावर जास्त काही लिहित नाही फक्त एकच आहे हे पुस्तक म्हणजे परस्त्रीला प्रेमात कसे पाडायचे याचे पाठ पढवतं.नवऱ्याच्या नकळत एखाद्या स्त्रीला प्रेमात कसं पाडायचं?? ( या अरबांची स्टाइल तेंव्हा पण तशिच होती. )मला वाटतं की पुस्तका पेक्षा फॅंटसी कडे वळणारे लेखन होते हे. १८५० च्या काळात अशी पुस्तकं छापणं  म्हणजे खुपच धैर्याचं काम होतं. ही पु्स्तकं कामोत्तेजक   जरी नसलं, तरीही नैतीक मुल्यांना धक्का देणारं म्हणुन हे पर्फ्युम्ड गार्डन तेंव्हा खुप गाजलं होतं. अशाच लेखनामुळे नैतीक अधःपतन होतं अशी कल्पना पण काही लॉर्डस लोकांनी हाउस ऑफ कॉमन्स मधे मांडुन त्यावर बंदीची मागणी केली.पुढली बरीच वर्ष यावर बंदी घातली गेली होती .

सगळ्यात जास्त गाजलेलं पहिलं सेक्स बद्दल स्पष्ट पणे लिहिल्या गेलेलं एका वेश्येचं आत्म चरित्र म्हणजेच फॅनी हिल्स वुमन ऑफ प्लेझर!! १७४८ साली ही कादंबरी लिहिली गेली. जॉन क्विलंड हा लेखक होता या कादंबरीचा. अतिशय धिट विषय, उत्कृष्ट हाताळणी, आणि भावना चेतवणारं लिखाण म्हणुन या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. फॅनी हिल्स म्हणजे आजकालची कहाणी फक्त लिहिल्या गेली १७४८ मधे.

एका गावाकडल्या मुलीला शहरात आणुन कुंटणखान्यात आणुन ठेवलं जातं. तिथे ती दररोजच  स्त्री पुरुष संबंध पहाते ,आणि नकळत त्या बद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण होतं तिच्या मनात.पुरुषाची भिती संपुन जाते .एकदा भिती संपली की तीला असे संबंध हवे हवेसे वाटु लागतात.    अगदी जो कोणी पहिला पुरुष येइल त्याबरोबर किंवा कोणाही बरोबर शैय्या सोबत करायची मानसिक तयारी होते तिचे.. नंतर तिचं चार्ल्स वर प्रेम बसुन त्याच्या  बरोबर पळुन जाणं, चार्ल्सच्या वडिलांनी त्याला परदेशी पाठवुन देणं.. आणि मग फॅनीचं केवळ स्वतःच्या सेक्स्युल निड्स पुर्ण करुन घेण्यासाठी  फुल फ्लेज्ड प्रॉस्टीट्य़ुशन -सुरु करणं आणि येन केन प्रकारेण …. जाउ द्या. .. पुस्तक वाचायचं असेल तर.. इथे आहे ते!  असं म्हणतात की त्या काळी स्त्रियांना लैगीक भावना फार दाखवणं अलाउड नव्हतं, कदाचीत म्हणुन एक स्त्री आपल्याला सेक्स आवडतो, आणि तो पुर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पुरुषांशी शैय्या सोबत करते.. ही गोष्टंच सर्व मान्य नव्हती.  म्हणुनही असेल हे पुस्तक गाजलेलं.  इतकी वर्ष बंदी असलेलं पुस्तक म्हणुन एकदा तरी वाचावं म्हणुन मी डाउन लोड केलं पण पुर्ण वाचलं नाही.. अर्धवट वाचुन सोडून दिलं.

दसऱ्या महायुध्दाच्या काळात , कोणी वॉल्टर हे काल्पनीक  नांव घेउन  एक माणुस  आपला निरनिराळ्या  १००० स्त्रियांबरोबरच्या सेक्स्युअल संबंधाची कहाणी   लिहितो. माय सिक्रेट लाइफ या अतिश्य पॉप्युलर पुस्तका मधे- आणि  ते पण ११ खंडामध .इस १८५७ च्या कालावधीमधे असे स्पष्ट लिहिले गेलेले हे एकुलते एक   अश्लिल पुस्तक म्हणावे लागेल.  खुप पॉप्युलर पुस्तक होतं ते.हलकं फुलकं, किंचीत तोच तो पणा असलेलं हे पुस्तक आहे..  अर्थात तुम्ही जर आजच्या अव्हेलेबल असलेल्या साहित्याबद्दल बोलाल, तर हे पुस्तक एकदम मिळमिळीत वाटण्याची शक्यता आहे पण १८५७ च्या काळात ह्या पुस्तकामुळे किती वादळ उठलं असेल ते तुम्ही समजू शकता.  हा वॉल्टर कोण होता ते कधिच समजलं नाही.या पुस्तकावर बऱ्याच देशात आणि खुप वर्ष बंदी होती.   (ऑब्सिन ऍक्ट च्या अंतर्गत बंदी ). ते पुस्तक इथे आहे. आजकालच्या अश्लिलतेच्या मानदंडापुढे हे पुस्तक एकदम फुसकं वाटू शकतं- आणि कंटाळवाणं तसेच रिपिटेटिव्ह नेचरचं.

एक पुस्तक होतं. १२० डेज ऑफ सोडोम. सेक्स फॅंटसी वर वाहिलेलं हे पुस्तक अतिशय बिभत्स म्हणता येइल असं पुस्तकत होतं. मार्किस नावाच्या फ्रेंच लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक सॅडिझम वर लिहिलं होतं. हे पुस्तक वाचलं की  किळस वाटते वाचतांना. यावरच एक चित्रपट पण काढला गेला होता- याच नावाने. याची लिंक मला सापडली पण मुद्दामच इथे देत नाही. १७व्या शतकात फ्रान्स मधे एका निर्जन भागातल्या पॅलेसमधे सरदार लोकं खुन, वासना, बि्भित्स वागणुक, यांचा जो खेळ खेळतात त्याचं वर्णन आहे या पुस्तकामधे. १६ कुमारीका, ८ तरुण, आणि काही स्त्रियांना एका ठिकाणी डांबून ठेवले जाते. हे सरदार चार वेश्यांकडुन त्यांचे अनुभव ऐकतात आणि त्यांची उजळणी या तरुणींवर केली जाते.या मधे छळाची वर्णनं आहेत केलेली की वाचतांना घृणा यावी. मी तर हे पुस्तक वाचुच शकलो नाही.शेवटी प्रत्येकाचाच खुन केला जातो. यु ट्युब वर काही क्लिप्स आहेत या चित्रपटाच्या. शोधा, हव्या असतील तर- मी देणार नाही लिंक्स किंवा पुस्तकाची पिडीएफ लोकेशन..

हेन्री मिलर नावाचा एक लेखक होऊन गेला. त्याने १९४० मधे एक ट्रॉपिक ऑफ कन्सर ही कादंबरी लि्हिली.अमेरिकेत ऑल टाइम फर्स्ट ५० बेस्ट नॉव्हेल्स मधे पण हिचा समावेश केला गेला आहे.

याच सुमारास  डेल्टा ऑफ व्हिनस हा कथा संग्रह पण प्रकाशित करण्यात आला- लेखिका होती अनेस निन -मिलरची प्रेयसी!!!!. असं म्हणतात की प्रत्येक पान  लिहीण्यासाठी लेखकाला त्या काळी एक डॉलर देण्यात आला होता. अट एकच होती, कादंबरी मधे इतर वर्णन, ्निसर्ग वगैरे अजिबात नसावे , फक्त सेक्स आणि सेक्स यावरच ही कादंबरी असावी. १९६७ मधे पेंग्विनने प्रकाशीत केलेली हा कथा संग्रह मजेशिर आहे.  या कथा संग्रहामुळे उत्तेजक लेखन करणारी पहिली लेखिका म्हणुन तिला मान मिळाला.

त्या काळात जेंव्हा आपल्या भारता मधे आपण राघो कर्वेंवर खटला चालवत होतो, त्याच काळात जगात इतकं काही  होऊन गेलं होतं. काही बाबतित मागासलेलं असणं  पण खुपच चांगलं असतं नाही??

राहुल गांधींची मुंबई भेट

मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता वगैरे नाही. पण जेंव्हा ह्या बातमी कडे एका त्रयस्थाच्या भुमिकेतुन पहातो तेंव्हा जे काही वाटलं ते इथे लिहितोय.

राहुल मुंबई लोकल मधे

आवाज कुणाचा?????? शिवसेनेचा…. असं म्हणत आरोळ्या ठोकणारा  शिवसैनिक आज काल दिसेनासा झालाय.   ढाण्या वाघ   आरोळी देतो, पण त्या कडे एखाद्या सर्कसमधल्या पिंजऱ्यातल्या वाघाच्या ओरडण्यासारखे जसे लक्ष दिले जात नाही, तसे यांच्या दमबाजी कडे लोकं अजिबात लक्षंच देत नाहीत असं काहीसं होतंय हल्ली. राहुल गांधी सारखा कच्चा बच्चा पण या कडे दुर्लक्ष करुन मुंबईला येतो आपली सभा आटोपुन परत जातो आणि  आपल्या स्वतःच्या राजकिय स्थैर्याचा पुरावा देतो.

नुसत्या पोकळ घोषणांचा तर आता अगदी कंटाळा आलाय. मराठी माणुस मुलतः सोशिक, नम्र आणि एखाद्याला नेता मानले, की  स्वतःचा  विचार न करता  जो नेता म्हणेल तसंच वागणारा अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे- पण ती खरी आहे कां?? मला तरी तसं वाटत नाही – इथे लोकं विचार करतात तुम्ही काय म्हणता त्यावर , फक्त दुर्दैव इतकंच की ते मतदान करायला जात नाहीत.!

राहुल आला, त्याने चक्क ट्रेन ने प्रवास केला अंधेरी ते घाटकोपर पर्यंत- जे धाडस आजपर्यंत कुठल्याही नेत्याने ( उध्दव , राज, बाळासाहेब तर आता वय झालंय म्हणा किंवा गेला बाजार कॉंग्रेसचे नेते – गोविंदा सोडून , पण तो गोविंदा नेता आहे कां हो??) केले नाही ते त्याने करुन दाखवले. आता शिवसेनेला घाबरुन त्याने असं केलं असा जर उध्दवचा गैर समज असेल तर शिवसेनेने खुशाल तसे समजावे- पण त्याने दाखवुन दिलं की  तो जे बोलला त्या नुसत्या पोकळ वल्गना नव्हेत .

ज्या प्रमाणे राजिव गांधींनी सुरक्षा व्यवस्था बाजुला ठेउन सामान्य लोकांच्या जवळ जाउन त्यांच्या मधे मिसळून वागणं सुरु केलं होतं, अगदी त्याच प्रमाणे, अतिशय पध्दतशिर पणे त्याने लोकल ट्रेनने प्रवास करुन लोकांना एक आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.

उध्दवचं म्हणणं की आमचे कार्यकर्ते असलेला रस्ता त्याने घाबरुन चुकवला आणि तो लोकलने गेला- असं समजुन स्वतःची पाठ थोपटुन घ्यायला बरं वाटत असेल तर उध्दवने तसे अवश्य समजावे.( प्रत्येकालाच हस्तिदंती मनोऱ्यात रहाण्याचा अधिकार आहेच) .

बरं शिवसैनीक इतके का कमी झाले आहेत  की रेल्वे प्लॅटफॉर्मवर, ट्रेन मधे , दादर प्लॅटफॉर्म वर सगळे लोकं राहुल गांधी की जय चा नाराच लावत होते. एकही माणुस किंवा गृप असा दिसला नाही की ज्याने राहुल गांधीमुर्दाबाद म्हणुन नारा लावला असेल. याचा अर्थ रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर एकही शिवसैनीक नव्हता असा घ्यायचा कां? आणि जर असं असेल तर……….

आजचे पेपर वाचतांना खुप मजा वाटली. मटा मधे उध्दव म्हणतो ( आजकाल तर तो काहीही बोलतो.. कायम असा कन्फ्युज्ड स्टेट मधे असल्या सारखाच असतो म्हणा तो – जसे दोन दिवसापुर्वीच राहुलला म्हणाला होता, की काश्मिरच्या लाल चौकात जाउन तिरंगा फडकवुन दाखव वगैरे .आता माझ्या सारख्या सामान्य माणसाला हे काश्मिर कुठुन मधे अचानक उगवलं असं वाटु लागलं?? तेवढ्यातच पुन्हा एक बातमी वाचली- राहुल ला म्हणाव ( कोणी म्हणाव???) की काश्मिरमधे पण कुणालाही जाउन रहाण्याचा अधिकार आहे असं म्हणुन दाखव- ( कलम नं ३७० आहे हे विसरला की काय ?) असो. आम्हाला इतके निर्बुध्द नका हो समजु, की तुम्ही काहिही बोलाल, आणि आम्ही त्यावर डॊळे मिटून विश्वास ठेउ..   इथे हे जसे तमाशामधे सवाल जवाब चालतात , त्या लेव्हलचे सवाल वाचलं की आम्हाला मळमळते हो हल्ली.. बस करा आता अशी फालतु निरर्थक कॉमेंट्स!!

मध्यंतरी रेडीओ मिर्ची नावाचा लेख लिहिला होता – त्या लेखावरची शेवटची कॉमेंट वाचा -सौरभ पंची ची….. त्या नंतर त्याच संदर्भात मी स्वतः आणि इतर काही लोकांनी   मनसे- शिवसेनेला पत्रं पाठवली होती.  एकाही पक्षाने या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक समजले नाही – अजुनही व्होडाफोन वाले मराठीत बोलत नाहीत, किंवा एफ एम वर एकही  जॉकी मराठीत बोलत नाही.

माझं असं मत झालेलं आहे की  निवडणुका जशा जवळ येऊ लागतात, तसा या राजकिय लोकांचा मराठी माणसावरच्या प्रेमाचा पुळका जास्तच वाढतो.  अतिशय  वाईट वाटतं की राजकिय  पक्षांना काहीतरी राजकिय लाभ असल्याशिवाय   मराठी प्रेम दाखवुन द्यायची इच्छा होत नाही.

मुंबई कुणाची?? हा अगदी बालिश प्रश्न आहे. हे असे प्रश्न उभे करुन लोकांमधे दुही माजवणं हेच राजकिय पक्षांचं काम आहे. इथे समजा असं म्हंटलं की मुंबई सगळ्यांची- तर काय फरक पडतो?? किंवा समजा असं म्हंट्लं की मुंबई मराठी माणसाची तरीही काय फरक पडतो?? नुसत्या फुकाच्याच बोलण्याने जर मुंबईची मालकी मिळत असेल तर ठिक आहे.. नाहीतर काहीही अर्थ नाही या असल्या घोषणाबाजीला.

राहुल गांधीची बिहारातली कॉमेंट पण एकदम पोरकट होती,  आणि आवश्यकता नसलेली होती. तेंव्हा तर एक राजकिय नेता असं वक्तव्य कसं काय करु शकतो म्हणुन खुप राग आला होता.अजिबात राजकिय प्रगल्भता नसलेला एक नेता काहीतरी बोलतोय असं वाटलं होतं..  मला तर खात्री होती की इथे म्हणजे मुंबईला आल्यावर तो नक्कीच मुंबई पोलिसांची वाहवाह करेल, पण इथे आल्यावर पण त्याने त्याला त्याची आवश्यकता वाटली नाही याचं वाईट वाटलं. कमीत कमी इथे आल्यावर त्याने शहिद झालेल्या मुंबई पोलिसांच्या शौर्याचा उल्लेख करायला हवा होता.

एक सिनेमा होता शाहरुख खानचा , चक दे इंडीया. त्यामधे तो सीन आठवतो?? मला खुप आवडला होता-जेंव्हा सगळ्या खेळाडूंना तो आपली ओळख सांगा म्हणतो तो सीन??  तेंव्हा सगळ्या मुली आपापल्या स्टेटचं नांव घेउन त्या स्टेटची आहे  असं सांगतात पण फक्त एकच मुलगी म्हणते मी भारताची …… जो पर्यंत ही राष्ट्रीयत्वाची भावना येणार नाही, तो पर्यंत विकास अवघड आहे.

शाहरुख खानच्या बाबतीत पण शिवसेनेने असंच काहीतरी म्हंटलं होतं की आम्ही माय नेम इज खान इथे लागु देणार नाही वगैरे वगैरे….. पण झालं काय़?? शेवटी ही पण एक फुसकी दम बाजी ठरली.शाहरुख म्हणतो मी माफी कशाबद्दल मागु?? शिवसेनेला आता शाहरुख, अमिताभ सारखे पण सिरियसली घेत नाही हल्ली!!!

एक शंका आली मनामधे, सध्या विदर्भात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजुनही होत आहेत. मला तरी एकही शेतकरी किंवा गरीब मराठी कामगार इथे रस्त्यावर फुटपाथ वर येउन राहिलेला दिसत नाही. उलट तो आपल्याच भागात राहुन आत्महत्या करतांना दिसुन येतं.इथे येणारे आणि फुटपाथ वर रहाणारे केवळ युपी आणि बिहारचेच कां असतात? याचं कारण एकच , मराठी शेतकऱ्यांमधे असलेला स्वाभिमान.. नुसता नारायण सारखं (विदर्भातले शेतकरी दारु पिउन आत्महत्या करताहेत म्हणणारा अती शहाणा (???) माणुस) पार्टीचं नांव स्वाभिमान ठेउन तो येत नसतो.. तो अंगी असावा लागतो त्या शेतकर्यांसारखा हे नार्याला कधी कळणार?). म्हणुन ते इथे मुंबईला येत नाहीत.

मुंबई मधे हे लोकं येउन रहातात, झोपड्या बांधतात- एक प्रश्न आहे, जर सरकारने ठरवलं की इथे मुंबई मधे झोपड्या वाढु द्यायच्या नाहीत तर त्यांना इथे रहाणं शक्य  होइल?? सगळेच राजकिय पक्ष ( शिवसेना, भाजप, कॉंग्रेस इन्क्लुडेड) इथे झालेल्या अनिधिकृत झोपड्या अधिकृत करण्यासाठी हिरारीने प्रयत्न करतांना दिसतात. वेळो वेळी आता ९७ पर्यंतच्या झोपड्या रेगुलराइज, मग २००० पर्यंतच्या अशा घोषणा ऐकत असतो आपण . त्यांच्या झोपड्या रेग्युलराइझ करुन , किंवा त्यांना आधी पर्यायी जागा फुकट देउन त्यांना इथे प्रस्थापित करणारे आपले  निवडुन दिलेले (कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा )नेते गण…. काय म्हणावं तेच समजत नाही. ( त्या ऐवजी त्यांच्या झोपड्या   पाडुन टाकुन त्यांना परत  कां पाठवत नाहीत?? किंवा पहिली झोपडी उभी रहाते तेंव्हाच ती हटवली का जात नाही?)

राजकिय नेत्यांनी प्रत्येक वार्डात अशा अनधीकृत लोकांसाठी रेशन कार्ड वगैरे काढुन देण्यासाठी  मदत केंद्र उभी केली आहेत.जेंव्हा तुम्ही आम्ही निवडुन दिलेले नेतेच असं करतात तेंव्हा हे बिहारी – यु पी वाले मजुर इथे येतच रहाणार,  झोपडपट्टी बांधतच रहाणार. सगळ्या मराठीच्या तारणहार लोकांना आता मराठी माणुस आठवेल तो पुढल्य  इलेक्शनलाच..  आणि …………. जाउ द्या हो. कोळसा उगाळावा तितका काळाच…

ब्रिटानिया…

बेलार्ड पिअर

पार्सी लोकं इतके समाजात मिसळले आहेत की माझी खात्री आहे की प्रत्येकाचा एक ना एक तरी पार्शी मित्र असतोच, आणि तो पण एकदम जवळचा. हे लोकंच इतके मनमिळाउ असतात की ह्यांच्याशी अगदी चांगली मैत्री होऊ शकते, यांच्याशी गप्पा मारतांना धर्म , जात कधीच आडवी येत नाही. पार्सी मित्राच्या  घरी गेलो.. तर केम छो डिक्रा?? म्हणुन त्याची आई किंवा आजी विचारणारच, आणि   अरे टुम किदरको गया था? बहुत दिनसे नै दिखा.. म्हणत त्याची आई पेस्ट्रीचा पिस समोर करणारच.

पार्सी लोक इथे भारतामधे पर्शिया मधुन आले, आणि इथलेच होऊन गेले.इथे आल्यावर सर्वार्थाने इथल्या भाषा,संस्कृती, समाजाला आपलंसं केलं.

मुख्यत्वे करुन बिझिनेस करणारी कम्युनिटी ही- आणि  तो पण अगदी सचोटीने. जमशेटजी टाटांपासुन तर रतन टाटांच्या पर्यंत किंवा आज जे एन गोदरेज पर्यंत कुठलाही बिझिनेस हाउस घेतले तरी त्यांच्या सचोटीची ग्वाही दिली जाउ शकते. हेच कारण आहे, की अजुनही तुप आणायचं , किंवा चांगला पेढा हवा असेल तर पार्सी डेअरी कडेच पाय वळतात ( काही लोकं म्हणतील की   पणशीकरांकडे दादरला.. पण .. .)मी तर  कुठल्याही हॉटेलमधे गेलो आणि  कुल्फी  ऑर्डर करायची म्हंट्लं की आधी वेटरला विचारतो की कुल्फी पार्सी डेअरीची आहे की नाही ते??

रतन टाटांनी सिंगुरचा प्लांट त्यांच्या काही इंजिनिअर्सला मारहाण केल्यावर होणाऱ्या नुकसानाचा विचार न करता एका क्षणात निर्णय घेउन बंद केला .मला तरी वाटत नाही की दुसरा कुठला इंडस्ट्रिऍलिस्ट आपल्या इम्प्लॉइज ला मारहाण केली म्हणुन अशी स्टेप घेईल  . हेच कारण आहे की आजही टाटा, किंवा गोदरेज किंवा इतर कुठल्याही पार्सी बिझिनेस मनचं नांव रिस्पेक्टफुली घेतलं जातं. पहिला स्टिल प्लांट सुरु करुन टाटांनी जी देशाच्या प्रगतीचा पाया घातला त्याला कोणिही विसरु शकणार नाही.

मुंबई मधे टाउन साईडला गेलं की बऱ्याच मोठ्या जुन्या इमारतींच्यावर पंख पसरलेला पक्षी  (फिनिक्स आहे कां तो?)- म्हणजे पार्सी लोकांची खुण दिसतो. त्याला काय म्हणतात ते माहिती नाही.टाउन साईडला मला सगळ्यात जास्त आवडणारा भाग म्हणजे बेलार्ड पिअर. अतिशय सुंदर हेरिटेज बिल्डींग असलेला भाग आहे हा.मला हा भाग  आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे- अगदी बरोबर ओळखलं- आहे इथे एक माझी फेवरेट खाण्याची जागा – ती म्हणजे  इथे असलेले ब्रिटानिया हॉटेल.

परवाचीच गोष्ट , शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडीया मधली मिटींग आटोपली, दुपारचा दिड वाजुन गेला होता. सोबत शब्बिर भाई होते, त्यांना  म्हंट्लं की लंच साठी ब्रिटानियालाच जाउ या. तसा ब्रिटानिया हा चॉइस , कुठलाच नॉन व्हेज खवय्या   नाकारु शकत नाही.कार पार्क केली आणि हॉटेल मधे गेलो तर नेहेमी प्रमाणेच तिथे भरपुर क्यु होता. यु विल हॅव टु वेट.. टेम मी योर नेम, काउंटरवरचा तो बावाजी म्हणाला. नांव सांगुन बाहेर गप्पा मारत उभे राहिलो आम्ही.  चांगलं १५- २० मिनिटांच्या नंतर आमचा नंबर लागला.

आत जाउन बसलो. टीपिकल इराणी लुक असलेलं हॉटेल. एज ओल्ड टीपिकल इराणी फर्निचर, हिरव्या चौकटीचा टेबल क्लॉथ!!आम्ही इथे क्रेडीट कार्ड घेत नाही ही पाटी मोठ्या दिमाखात झळकत होती  की वेडाउन दाखवत होती???

इथे पाण्याचा ग्लास आणुन ठेवत नाही समोर. इथे आल्यावर इथला जिंजर सोडा प्यायलाच हवा. पण आज  मात्र पहिल्यांदा   जिंजर सोडा, आइस्क्रिम सोडा की रास्बेरी सोडा? काय मागवावं  ह्यामधे कन्फ्युजन झालं. थोडा  विचार करुन शेवटी आइस्क्रीम सोडा फायनल केलं.

ऑर्डर घ्यायला एक ८० -८५वर्ष वयाचे  बावाजी समोर उभे ( आता बावाजी म्हंटलं की एकेरी उलीखच केला जातो, पण त्यांचं वय इतकं होतं की एकेरी उल्लेख करायची इच्छाच होत नाही)  स्वच्छ गोरा रंग, बदामी रंगाची पॅंट, पांढरा शर्ट आणि काळा बेल्ट. हॉटेलचा मालक स्वतः ऑर्डर घ्यायला समोर उभा . मेनु कार्ड समोर ठेवलं.जास्त विचार करण्याची गरजच नव्हतीच- चिकन बेरी पुलाव आणि फिश पात्रा मागवला. म्हणाला, “फिश विल टेक टाइम..” म्हंटलं ओके. आइस्क्रिम सोड्याचे घोट घेत चिकन पुलावची वाट पहात बसलो .


चिकन बेरी पुलाव

सहज समोर लक्ष गेलं. एका चौघांच्या टेबलवर चार फिरंगी बसले होते. अगदी चवीने इंडीयन फुड एंजॉय करीत . त्यांचं बहुतेक झालं होतं. वेटरने बिल आणुन ठेवलं आणि ह्या लोकांनी त्या वेटरला चक्क ३०० रुपये टिप ठेवली. म्हंटलं वेटरची दिवाळी आज!!!

तेवढ्यात आमची पण चिकन पुलावची प्लेट समोर आणुन ठेवली गेली. पुलावा वार तळलेला ब्राउन रंगाचा कांदा आणि  ते लाल चुटूक रंगाची बेरी ची फळं लक्ष वेधुन घेत होती. किसमिस पेक्षा पण एक चतुर्थांश आकाराचे हे फळ, चिकन पुलावला तळलेल्या कांद्यासोबत  एक अप्रतिम टेस्ट देते. (ही बेरी इराणहुन इम्पोर्ट केलेली असते बरं कां.. म्हणुनच स्पेशालिटी आहे या हॉटेलची) समोरच्या प्लेटमधे पार्सी मसाल्यामधे घोळलेले चिकनचे तुकडे     बासमती तांदुळाने झाकल्या गेले होते. अजिबात रहावलं नाही आणि  चमचा खुपसला, थोडा भात बाजुला केला आणि त्या चिकनच्या   तुकड्याशी हाता तोंडाची लढाई सुरु केली- पहिला घास घेतल्याबरोबर , तोंडातुन वाह!!उदगार निघाला  आणि मग पुर्ण प्लेट संपेपर्यंत आम्ही दोघंही  अजिबात एक मेकांशी बोललो नाही.

पुलाव संपत आला वेटरने त्याने बॉंबे डक ची प्लेट समोर आणुन ठेवली. आता हा फिश इतका सॉफ्ट असतो की तोंडात घातल्याबरोबर विरघळतो. हा फिश बनवण्याची पार्सी पध्दत कशी असते ते माहिती नाही, पण अप्रतिम टेस्ट असते ह्या  फिश पात्राची.मला वाटतं बहुतेक बॉंबे डक वाफवलेला असावा , कुठल्यातरी पानात गुंडाळुन..म्हणून पात्रा फिश!!

कार्मेल कस्टर्ड

सर्व्हिस खुपच फास्ट आहे – अर्थात असायलाच हवी कारण बाहेर वेटींग खुप जास्त  होतं. जशी चिकन ची प्लेट संपत आली वेटर येउन विचारुन गेला.और कुछ?? आता ब्रिटानियामधे आल्यावर कार्मेल कस्टर्ड न खाता परत जाणं म्हणजे सिध्दिविनायकाच्या मंदीरात जाउन दर्शन न घेता परत येणं.

कार्मेल कस्टर्डची प्लेट समोर आणुन ठेवल्याबरोबर तुटुन पडलो , आणि दोनच मिनिटात संपवली. अजुन एक हवी.. असं वाटत होतं, पण वाढलेलं  वजन आठवलं की ऑर्डर देण्यासाठी उघडलेलं तोंड आपोआप बंद झालं. ( नको त्या गोष्टी का बरं आठवतात??)  बिल देउन उठलो, आणी संथ पणे जेवणाची नशा एंजॉय करीत ऑफिस कडे निघालो.  टाउन साईडला आलात की  ह्या   हॉटेलला भेट देण्यासाठी थोडा वेळ जरुर ठेवा…

उल्लेखनीय…

थोडी पाय टेकवायला जागा आणि हात धरायला बार असेल तर ... बरं वाटतं.

सायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव होऊ शकतो- जर चांगला मोकळा रस्ता असेल आणि जड वाहनांची भिती नसेल तर.आजकाल तर अगदी १६ वर्षाचा मुलगा झाला की मोटरबाइक चालवणं सुरु करतो.हल्ली पालकांची क्रय शक्ती वाढल्यामुळे मुलांचे असे लाड पुरवणं अगदी कॉमन झालेलं आहे. मुल १६ चं झालं, की लगेच बाइक किंवा स्कुटीची किल्ली हातात दिली जाते. क्लासेस, कॉलेज वगैरे जर ५-६ किमी अंतरावर असेल तर सायकल ने सहज जाता येउ शकते. असो..

मला वाट्तं की हेच कारण असावं की आजकालची मुलं थोडी जास्त हेल्दी दिसतात- ओव्हर वेट म्हंटलं तर वाईट वाटेल म्हणुन हेल्दी शब्द वापरलाय. थोड्या प्रमाणात याला पालक पण जबाबदार आहेत. आपल्या मुलांनी सायकल चालवली तर ते त्यांना कमी पणाचं वाटते, तसेच कॉलेजमधली इतर मुलं जर बाइक आणत असतील तर मग आपण सायकल कशी चालवायची? जर आपण सायकल नेली तर आपण ऑड मॅन आउट होऊ अशी भिती पण असते मुलांना.

सायकल साठी स्पेशल लेन

सायकल्स …अगदी कुल सायकल्स  चांगल्या ७-८ हजाराच्या अव्हेलेबल आहेत भारतामधे. अनिकेतच्या ब्लॉग वर बघा बरीच माहिती मिळेल. सायकलींग चे फायदे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. असंच वाचतांना एक लेख वाचण्यात आला , त्यात त्याने काही युरोपियन देशात आणि अमेरिकेतील काही राज्यात सायकल स्वारांसाठी वेगळॆ लेन सुरु करण्यात आले आहेत अशी माहिती दिलेली होती. सायकल चालकांना मुख्य भिती असते ती कारची आणि जड वाहनांची .सेपरेट लेन मुळे  रस्त्यावरुन अपघाताची भिती न बाळगता सायकल चालवता येउ शकते. सायकल चालवण्यासाठी दिलेले प्रोत्साहन हे नक्कीच वाखाणण्यासारखे आहे.

जेंव्हा एखाद्या सिग्नलला उभं रहाण्याची वेळ येते तेंव्हा थोडं त्रासदायकच होतं. वाकडं होऊन एका पायावर जोर देउन उभं रहावं लागतं. याच कारणासाठी डेन्मार्क मधे खास सायकल स्वारांना थॊडी विश्रांती मिळावी म्हणुन रस्त्याच्या बाजुला स्टॅंड्स उभे केले आहेत. त्यावर पाय ठेउन सायकल स्वार कम्फर्टेबली उभा राहु शकतो. त्याच सोबत धरुन उभं रहायला एक बार पण दिलेला आहे- एक लहानशी पाटी पण लक्ष वेधुन घेते.. तुम्ही सायकल चालवल्या बद्दल तुमचे आभार.. खुप छान वाटलं वाचल्यावर म्हणुन इथे शेअर करायला पोस्ट करतोय… जेंव्हा आपण पर्यावरणाची काळजी करतो  तेंव्हा केवळ विज, पाणी आणि प्लास्टीकचाच विचार न करता इतरही गोष्टींचा विचार करायला हवा :) त्यातलिच एक म्हणजे पेट्रोल बचत…

नौकरी मधे काय मिळवलं ?

प्रत्येकालाच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणुन नौकरी किंवा धंदा करावाच लागतो.आता पोटा पाण्याचा म्हंट्लं म्हणजे पैशासाठीच नौकरी करतो प्रत्येक जण. पैशाव्यतिरिक्त काही मिळु शकतं कां नौकरीतुन??   मी गेली २७ वर्ष नौकरी करतोय. बरेचदा असंही वाटतं की आता रिटायरमेंट नंतर पुढे काय? तसा अजुन बराच वेळ आहे रिटायरमेंटला. पण तरिही हा प्रश्न हॉंटींग करितच असतो. गेल्या सत्ताविस वर्षातील नौकरी ने मला काय दिले?? पैसा?समृध्दी? नांव लौकिक?? ओळख??? काय दिलं मला या इतक्या वर्षांच्या नौकरीने??? ह्या सगळ्या गोष्टी तर नौकरी मधे अनुभव आणि अधिकारा सोबत आपोआपच येतात.

वय वाढलं की राजु चा राजाभाउ होणं किंवा बाळ चा बाळासाहेब होणं , माधव चा माधवराव होणं, हे जितकं सहाजिक असतं , तितकंच हे नौकरीमधली प्रमोशन्स, इन्क्रिमेंट्स, आणि त्या प्रमाणात मान, हा वाढणं सहाजिक असतं असं मला वाटतं. म्हणुनच नौकरीने मला काय दिलं ह्या प्रश्नापेक्षा मी स्वतः नौकरी मधे काय मिळवलं?? हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटतो .

ह्या प्रश्नाचं उत्तर  शोधायचा प्रयत्न केला तर  अगणीत प्रश्नांची मालिका मात्र डोळ्यासमोर उभी राहिली. मला खरंच काही सुचत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर! कदाचित समज कमी पडत असेल. आता नौकरी मधे पैशा शिवाय काय मिळतं?? जॉब सॅटीस्फॅक्शन?  छेः.. हे तर अगदी सामान्य उत्तर झालं..  काय बरं मिळवलं असावं मी???

सुरुवातीची तिन वर्ष प्रॉडक्शन डिपार्टमेंटला शॉप फ्लोअर वर काम केलं होतं.  नुकताच कॉलेजमधुन बाहेर निघालो होतो, जगाची ओळख नव्हती. तेंव्हा शॉप फ्लोअरवर वडिलांच्या वयाच्या लोकांकडुन कामं करुन घेतांना खुप विचित्र वाटायचं. बरं ते सगळे बेरकी लोकं अगदी पोहोचलेले होते – एखादं काम सांगितलं की ते का होऊ शकत नाही हे सांगण्याकडे जास्त कल असायचा.  आमच्या सारख्या नविन लोकांना अगदी कोळुन प्यायचे, पण तेंवढ्यात  सिनिअर इंजिनिअर आला आणि त्याने पण तेच काम सांगितलं तर अगदी न कुरकुरता तेच काम पुर्ण करायचे.!! तेंव्हाच  पहिली गोष्ट शिकलो, ती ही की इथे नौकरी मधे वयापेक्षा पोस्ट महत्वाची. फक्त एखाद्याचे पांढरे केस असले म्हणुन त्याला जास्त   रिस्पेक्ट  दिला तर तो डोक्यावर पण बसु शकतो.

कधीच कोणाला मी कामाच्या निमित्याने खुप फिरणं झालं. सुरुवातीच्या काळात तर पुर्वांचला पासुन तर दक्षिण भारता पर्यंत सगळ्या भागात फिरावं लागायचं. तेंव्हा सगळा प्रवास हा रेल्वेनेच करावा लागायचा. फक्त मॅनेजर्स लोकांना विमान प्रवास करणे  हे कंपनीच्या नियमात बसत होते. सगळ्यात प्रवास कंटाळवाणा व्हायचा तो मुंबई ते कलकत्ता. प्रवासात शेजाऱ्यांशी गप्पा मारणे हे मला तरी कधीच जमले नाही. स्वभाव संशयी, आणि नुकतीच वडिलांच्या चुलत भावाला काही तरी गुंगीचं औषध खाउ घातल्याची घटना, आणि त्याचा त्यात झालेला मृत्यु मुळे असेल, पण आजही मी प्रवासात कधीच कुणाशी ओळख वाढवायचा प्रयत्न करित नाही.

माझं आजही असं मत आहे , की प्रवासातल्या ओळखीचा कधिच काही फायदा नसतो, लोकं विनाकारण एकमेकांना नांव पत्ता, फोन नंबर देतात-आयुष्यात  कधीही न भेटण्यासाठी!! प्रवास व्हायचा कंटाळवाणा, मग पुस्तकं वाचणं हाच एक उपाय असायचा. प्रवासात हेरॉल्ड रॉबिन्स,इर्विंग वॅलेसची सगळी पुस्तकं वाचायचो तेंव्हा मी. समोरच्या सोफ्यावर दोन उषा आडव्या लाउन एखादं बेस्ट सेलर वाचणे हा तर माझा अगदी लहानपणापासुनचाच छंद होता.. इथे त्याला खत पाणी मिळालं!!

जेफरी आर्चर पण खुप वाचला. त्याचं नॉट अ पेनी मोअर – नॉट अ पेनी लेस अगदीलक्षात रहाण्यासारखं पुस्तक आहे..केन ऍंड एबल आणि त्याचा सिक्वेल प्रोडिगल डॉटर पण कलकत्ता प्रवासातच वाचलं होतं. वाचनाची आवड होतीच, पण ती पुन्हा जास्त वाढली.. प्रवासामुळे!!प्रवासात वाचलेली काही पुस्तकं तर अजुनही आठवतात. स्फिंक्स, फाउंटन हेड ही दोन्ही पुस्तकं  अशीच आठवणीत राहिलेली. तेंव्हा जी वाचनाची आवड लागली , ती आजपर्यंत टिकुन आहे.

म्हणतात ना, “वाचाल तर वाचाल”. मला वाचायला काही पण चालतं- पण शक्य तो नविन मधला जॉन ग्रिश्म,  आणि जुन्यातला  रॉबर्ट लुडलुम  (बोर्न सिरिजनी तर वेड लावलं होतं राव! काय लिहायचा हा माणुस, जेंव्हा वारला तेंव्हा खुप वाईट वाटलं. त्या पब्लिकेशन हाउसने त्याच्या नावाने नंतर पण काही पुस्तकं प्रसिध्द केलीत.. असो.. )  मला वाटतं की माझी वाचनाची आवड जोपासायला माझी फिरतीची नौकरीच कारणीभुत ठरली.

वाचनाची आवड वाढली.. आणी सोबतंच , जितकं जास्त वाचत गेलो, तितकं जास्त एकलकोंडा होत गेलो.पुण्याला  असतांना गुरुवारी सुटी असायची, पण त्या दिवशी पण लायब्ररीतुन आणलेलं पुस्तक वाचत दिवस भर पडुन रहाणं मला बरेचदा आवडायचं. नंतर थोड्या दिवसांनी एका नविन मुलाशी ओळख झाली . तो अगदी हार्ड कोअर ट्रेकर.. मग त्याच्यामुळे ट्रेक्स ला जाउन,  ट्रेकिंगची आवड निर्माण झाल्यावर मात्र बरेच मित्र झाले, आणि मग गुरुवारी रुमवर बसुन वाचत   रहाणे सुटले…

एकदा साईटला पोहोचलो की मग बरेचद कस्टमरशी ओळख वगैरे झाल्यावर काही कस्टमर्स तर पर्सनल फ्रेंड्स बनले. तुम्हाला कदाचित खोटं वाटेल, पण मला गेली २३ वर्ष  आमचे एक जुने कस्टमर आहेत,  सिलिगुडी जवळच्या एका टी गार्डनचे मॅनेजर ,  श्री अग्रवाल म्हणुन- त्यांच्या साईटला मी २३ वर्षापुर्वी गेलो होतो  आणि तेंव्हा दोन तिन दिवस एकत्र राहिलो – त्या नंतर त्यांच्याशी एकदा पण भेट झाली नाही ,पण आजही ते   न चुकता नववर्षाला ग्रिटींग पाठवतात आणि फोन करतात.. तसाच एक गोहातीचा मनोज.. असे अनेक लोकं खुपच अंतरंगातले मित्र झाले. इतकी वर्ष झाली पण अजुनही मी बऱ्याच लोकांशी  संपर्कात आहे.  भरपुर मित्र!!! मला वाटतं हेच मिळवलं मी पैशा व्यतिरिक्त माझ्या नौकरीमधे.

प्रवास खुप झाला. आणि प्रवासाने शहाणपण येतं असं म्हणतात…  मला ते आलं नाही असं वाटतंय हल्ली.. कारण सौ. आणि मुली- बाबा तुम्हाला काहिच समजत नाही असं म्हणत असतात  . :D

नौकरी च्या निमित्याने जेंव्हा वॉरंटी पोर्टफोलिओ पण सर्व्हिसचा भाग म्हणुन सांभाळावा लागला, तेंव्हा ’ नाही ’ कसं म्हणायचं हे शिकलॊ. ज्या मशिन्स आम्ही विकतो त्यांची किंमत ५ लाख ते ५० लाख कितीही असु शकते. तेंव्हा एखादा पार्ट फेल झाला की वॉरंटी ऍडमिनिस्ट्रेशन महत्वाचं. बरेच कस्टमर्स मित्र पण झालेले असतात. तेंव्हा त्यांना ’फेल्युअर वॉरंटबल  नाही’ हे म्हणण्याचा स्पष्टवक्ता   पणा आवश्यक असतो. आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की, माझ्या अशा स्पष्टवक्तेपणामुळे कोणाशिच  मैत्रीत फरक पडला नाही. नौकरी आणि मैत्री वेगवेगळ्या कंपार्टमेंट्स मधे ठेवायला शिकलो ..

मध्यंतरीची काही वर्ष मार्केटींग मधे काम केलं. तेंव्हाचा अनुभव पुर्णपणे वेगळा होता.लोकं भेटायला बोलवायचे अन तासन तास बसवुन ठेवायचे- अगदी अपॉइंटमेंट घेउन गेल्यावर सुध्दा.मी पण अगदी शांतपणे एखादं पुस्तकं काढुन वाचत बसायचो. ह्या अशा वेटींग मुळे मी नेहेमी स्वतःला सेल्स इंजिनिअर नाही तर इंजिनिअर इन रिसेप्शन/ कॉरिडॉर असे म्हणायचो.या सगळ्या प्रकारामुळे सोशिकपणा मात्र नक्कीच अंगी वाढला  . मान – अपमानाच्या कल्पना बदलल्या . कोणी बोलाउन भेटलं नाही तरी पण डिस्टर्ब होत  नाही मी ! एखाद्या पार्टी मधे एखाद्या मित्राने, किंवा कलिगने इग्नोअर केलं किंवा एखाद्या वेळेस बॉस ने समोर बसवुन ठेउन स्वतःचं काम करणं सुरु ठेवलं, तरी राग न येउ देता शांत रहाणं शिकलॊ मी… थोडक्यात काय तर  एखाद्या सुने प्रमणे सोशिकपणा वाढलाय.

मुळ स्वभाव किती बदलु शकतो नौकरी मुळॆ?? माझा स्वभाव ऍरोगंट आहे हे तुम्ही आजपर्यंतच्या माझ्या पोस्ट वरुन ओळखलंच असेल- एखाद्याशी भांडण झालं  आणि  जर झी चुक नसेल तर कोणाही पुढे नमतं न घेण्याचा स्वभाव आहे माझा.मित्र म्हणतात, मी खुप ऑफेन्सिव्ह आहे. ( खरं आहे का ते मला माहिती नाही) .  पण.. आता उध्दट पणे प्रत्युत्तर देणं,रागिट आणि  एकलकोंडा असा  हा  माझा मुळ स्वभाव खुप सोशल झालाय – ह्याची जाणिव होते जेंव्हा विचार करतो की मी काय मिळवलं या नौकरी मधे  हा विचार केला तर!!!अर्थात अधुन मधुन पुन्हा पुर्वीचा मुळ स्वभाव डोकं वर काढतो, पण त्याला काही उपाय नाही.. खरं नां??

सती.. एक शापित प्रथा…

सती

आज सकाळी उठलो आणि मुख्य बातम्या बघाव्या म्हणुन   टिव्ही सुरु केला. सर्फिंग करतांना एका चॅनल वर आपोआपच रेंगाळलो. मंगल पांडे हा सिनेमा सुरु होता त्या चॅनलवर. एक सीन होता, एक प्रेत यात्रा जाते आहे, एका मुलगी लाल साडी मधे नखशिखान्त मेकप करुन एका तिरडीवर बसलेल्या अवस्थेत  नेली जात आहे. तिरडीला चार लोकांनी खांदा दिलेला आहे. ती स्त्री ट्रान्स मधे असल्यासारखी नुसती बसलेली आहे. मागे बरेच लोकं हातामधे काठ्या घेउन सती माता की जय .. हा जय घोष करीत जात आहेत.

इकडे नदीकिनारी आल्यावर तिथे एक चिता रचुन ठेवलेली आहे. त्यावर त्या स्त्रीच्या नवऱ्याचं प्रेताशेजारी त्या स्त्रीला बसवतात. तिच्या मांडीवर त्या मेलेल्या नवऱ्याचं डोकं ठेवलेलं असतं.  जय घोष सुरु असतो.. सती माता की जय .. चा आणि त्या चितेला आग लावली जाते. जोर जोरात जय जय कार करणे सुरु असते.. त्या स्त्रीला जेंव्हा चटके बसतात ती तेंव्हा एकदम भानावर येते, आणि त्या चिते वरुन उतरायचा प्रयत्न करते. आजुबाजुचे लोकं तिचा जय घोष करित तिला हातातल्या काठ्यांनी मारुन पुन्हा चिते मधे ढकलतात.इकडे त्यांचा सती माता की जय चा घोष सुरु असतो… आणि हे सगळं होत असतांना बघुन मी चॅनल चेंज करतो.. पण मनावर  त्या सीनचा जो इम्पॅक्ट व्हायचा तो माझ्यावर झालाच. एकदम उदास वाटु लागलं.

थोड्या वेळाने सौ. म्हणाली की भाजी घेउन या.. सगळी भाजी संपली आहे – मी बाहेर निघालो आणि लिफ्ट पर्यंत पोहोचलो तर मागुन आवाज ऐकू आला  येतांना राणी सती मार्गावरुन   फॉल पिको ला दिलेली साडी दिलेली साडी घेउन या.. राणी सती नाव ऐकल्यावर मस्तकामधे एकदम तिडीक ऊठली ,कदाचित सकाळी पाहिलेल्या सीनचा परिणाम असावा.  इथे पण मंदीर आहे राणी सतीचं, कधी गेलो नाही त्या मंदिरात, आणि आजपर्यंत कधी लक्षात पण आलं नाही त्या मंदिराबद्दल- पण आजचा सकाळी पाहिलेला सीन.. तो मला स्वस्थ बसु देत नव्हता.

मुंबईसारख्या शहरामधे पण सती ची पुजा करणाऱ्या बायका आहेत आजही, हे प्रकर्षानं जाणवलं, जेंव्हा तिथे साडी घ्यायला गेलो तेंव्हा मंदिरामधुन अगदी अपटू डेट कपडे घातलेल्या सुशिक्षीत स्त्रीया दर्शन घेउन बाहेर येतांना दिसल्या, आणि लक्षात आलं- आजही अशा प्रथेचा उदो उदो करणाऱ्या स्त्रिया आहेत मुंबई सारख्या शहरात. जर मुंबई सारख्या शहरात ही परिस्थिती आहे, तर लहान गावांत कशी असेल?

सती प्रथे वर बंदी आणुनही आज १८१ वर्ष झाले आहेत. तरीही अजुनही कधी तरी एखाद्या कोपऱ्यात लहानशी बातमी असतेच पेपर मधे – एखाद्या स्त्रीने सती जाण्याचा प्रयत्न (??) केला म्हणुन! आता तिने स्वतः सती जायचा प्रयत्न केला की इतर लोकांनी तिला सती जाण्यासाठी भाग पाडले? हे कधीच समजत नाही. ही बातमी नेहेमी   एखाद्या लहान गावातलिच असते.  एखाद्या स्त्री ने सती गेल्यावर तिचं मंदीर बांधण्याची प्रथा  म्हणजे त्या अघोरी  प्रथेचं उदात्तीकरण आहे.

राजस्थानात आजही सती प्रथेचे उदात्तीकरण होते आहे. खुप मोठं मंदिर आहे सतीचं.लोकं आजही राजस्थानात गेले की या मंदिरात आवर्जुन जातात दर्शनाला.

एका गोष्टीचं वाईट वाटतं , की आजही ह्या शिकल्या सवरल्या स्त्रिया   सती मंदिरात जाउन प्रार्थना करतात. एक तुळशी वृंदावन, त्यातुन बाहेर निघणारे दोन जोडलेले हात. त्यामधे अगदी कोपरापर्यंत बांगड्या, म्हणजे सती मंदीर जवळच आहे याची खात्री!!!!

राजा राममोहन रॉय , हे ब्रह्मो समाजाचे स्थापन कर्ते इ.स. १९२८ .पश्चिमी सभ्यते मधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी यांनी आपल्या देशात रुजवण्यासाठी खुप मोठे कार्य केले. ह्या माणसाने सोशल रिफॉर्म्स साठी केलेले कार्य   भारतिय स्त्रियांनी अजिबात विसरु नये- पण दुर्दैवाने आज त्यांचे नाव पण कुणालाच माहिती नाही- काळाच्या ओघात विस्मृतीआड गेले आहे. केवळ राममोहन रॉय यांच्याच प्रयत्नाने १८२९ साली सती प्रथा ही लिगली चुक आहे म्हणुन लॉर्ड विल्यम बेंटींग यांनी  सती प्रथेवर बंदी आणली.

स्पेशली उच्च वर्गातिल स्त्रियांचे सती जाण्याचे प्रमाण खुप जास्त होते. ही प्रथा बंद करुन फायदा झाला तो उच्च वर्गीयांचाच . कारण विधवा विवाह हा सर्व सम्मत नव्हता. विधुर दुसरे लग्न करु शकत असे, पण विधवा मात्र कधीच पुनर्विवाह करु शकत नव्हती- सामाजीक रुढी आणि बंधनांमुळे स्त्री ही पुरुषाची मालमत्ता हा कन्सेप्ट होता, आणि कदाचित म्हणुनच पुरुषाच्या मृत्यु नंतर स्त्री ने पुन्हा आयुष्य जगु नये म्हणुन तिला सतीचा दर्जा देउन खुन करणे ह्याला उदात्तीकरण प्राप्त झाले असावे.

स्त्रीच्या मनावर पण जर लहानपणापासुन असं बिंबवलं की पुरुष नसेल तर तुझं आयष्य निरर्थक, की मग ती सती जाण्यास तयार  होइलच! या शतकात सती गेलेल्या स्त्रियांची माहिती इथे सापडेल..

आजच्याही युगात स्त्री भृणाची हत्या जी केली जाते ती कदाचीत याच मानसिकतेचा बळी आहे. पुर्वीच्या काळी स्त्री जन्म म्हणजे एक शापच समजला जायचा. सती प्रथे मुळे, हुंडा पध्दती मुळे किंवा बालविवाह आणि अकाली येणाऱ्या वैधव्यामुळे  असं झालं असावं कदाचित.पण त्या काळच्या मानसिकतेचा इंपॅक्ट अजुनही आपल्या समाजावर आहे आणि आजही वंशाला दिवा हवा असा अट़्टाहास असणारे बरेच लोकं आहेत.

राजस्थानात आजही सती प्रथेचे उदात्तीकरण होते आहे. खुप मोठं मंदिर आहे सतीचं.लोकं आजही राजस्थानात गेले की या मंदिरात आवर्जुन जातात दर्शनाला.  आता तरी स्त्रियांनी स्वतःच जागं होऊन अशा रानटी प्रथा आणि त्यामुळे लादलेल्या देवत्वाला आणि मंदिरांना न जाणे हिच राजा राममोहन रॉय यांना श्रध्दांजली ठरेल.

शुन्य रुपयांची नोट..

शुन्य रुपयांची नोट

कुठल्याही शासकिय कार्यालयात गेलात की इकडे तिकडे थोडे हात ओले करावे लागतातच काम करुन घ्यायला, आणि आपण पण ही गोष्ट समजुनच चालतो.  दुर कशाला , रेल्वे ने प्रवास करतांना तर जरी बर्थ उपलब्घ्द असला तरी, टीसी काही जास्त पैसे घेतल्या शिवाय तुम्हाला देत नाही. नियमाप्रमाणे पैसे घेउन बर्थ दे म्हंट्लं, तर सरळ नाही म्हणुन चालायला लागतो- आता अशावेळी तुमच्या हातात काहीच नसल्याने सरळ तो म्हणेल तेवढे पैसे देउन काम पुर्ण करुन घेणे इतकेच आपल्या हातात असते. करप्शन हे आपल्या रक्तातंच भिनलं आहे.

आरटीओ मधे असलेल्या करप्शन बद्दल न बोललेलेच बरे. अधुन मधुन एखाद्या अधिकाऱ्याला पकडुन सस्पेंड केलं जातं, पण त्याच वेळेस इतर लोकंही करप्ट आहेतच, आणि जो कोणी पकडल्या गेला आहे, तो या सिस्टीमचा एक लहानसा प्यादा आहे, हे माहित असुनही इतरांना कुरणात चरायला मोकळं सोडून दिलं जातं. आपण सुध्दा  मानसिक दृष्ट्या इतके निर्ढावलेले आहोत की ह्या बातमीची किम्मत आपल्या मते अगदीच नगण्य असते.

एक एन जी ओ आहे फिफ्थ पिलर नावाची. तिने एक आयडीया काढली आहे. एक नोट आहे शुन्य रुपयांची. त्या एनजीओ चं म्हणणं असं आहे, की तुम्हाला कोणी लाच वगैरे मागितली की ही शुन्य रुपयांची नोट तुम्ही द्या त्या माणसाला. म्हणजे त्याला हे लक्षात येइल की तुम्ही लाच देण्याच्या विरोधात आहात , आणि तो नियमा प्रमाणे तुमचे काम करेल. अर्थात हे असं होणं कमीत कमी भारतामधे तरी शक्य नाही हे त्या एन जी ओ ला समजलेले दिसत नाही. तद्दन फालतु पब्लिसीटी स्टंट आहे त्या एन जी ओ चा असे मला वाटते.

याच वेब साईटवर ही पण माहिती दिलेली आहे, की तुम्हाला जर या एन जी ओ चा मेंबर व्हायचं असेल तर १०० रुपये द्यावे लागतील.आणि  जर तुम्ही भारता बाहेर रहात असाल, तर ५० डॉलर्स. आता या पैशाचं ते काय करतात?? त्याची माहिती कुठेच दिलेली नाही. सगळ्या जगातल्या देशांच्या शुन्य रुपयांच्या नोटा छापल्या आहेत त्यांनी.

करप्शन संपवणं जर इतकं सोपं असतं तर किती छान झालं असतं?  शुन्य रुपयांच्या नोटा वाटा कोणी पैसे मागितले तर..  अशा बालिश कल्पनांवर हसावं की रडावं हेच समजत नाही… ट्वीटर वर जवळपास शंभरपेक्षा जास्त लोकांनी ही शुन्य रुपयांच्या नोटेची लिंक ट्विट केलेली आहे- मला वाटतं, त्या एनजीओला जी प्रसिध्दी हवी होती ती मिळालेली आहे .बेस्ट वे टु ऍडव्हर्टाइझ असं म्हणता येइल या सगळ्या खेळाला.

आता काही वर्षापुर्वी तो मुन्नाभाई मधे कपडे काढुन देण्याचा सिन दाखवला होता. असे सिन फक्त सिनेमातच शोभुन दिसतात. डे टू डे आयुष्यात नाही. माझ्या मते हा फक्त एक पब्लिसिटी फार्स आहे. एखाद्या अधिकाऱ्याला   जर अशी  शुन्य रुपयांची नोट- लाच म्हणुन  दिली , तर तो  अधिकारी आयुष्य भर तुमचे काम करणार नाही हे नक्की. उलट तुम्हालाच अजुन पन्नास प्रकारचे कागदपत्र वगैरे मागेल.. भारतिय कायदे असे आहेत की त्या मधे  असे  नियम आहेत की काम न करण्यासाठी हजारो बहाणे देता येतात.

शेवटी जाहिरात म्हणजे काय?  “विंकिंग ऍट अ गर्ल इन डार्क”  :)
तुम्हाला डॊळा मारल्याचं समाधान, तिला समजलं नाही, म्हणुन तीला पण काही फरक पडत नाही.. विन विन सिच्युएशन दोघांसाठी पण!! बस्स….

इंडीया शाइनिंग

कधी कधी अशा पण साईट्स दिसतात , की त्या पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो.  भारतामधे पण माहिती तंत्रज्ञानाबद्दल असलेली जाण किंवा आस्था  कुठल्या थरापर्यंत पोहोचली आहे याची कल्पना    जोपर्यंत अनपेक्षीत पणे  एखादी साईट समोर एखादी अनपेक्षीत पणे येत नाही,   तो पर्यंत  येत नाही.

कालच ,सर्फिंग करतांना   एक साईट दिसली. स्वतःचा बिझिनेस प्रमोट करण्यासाठी असलेली ही साईट बघुन खुप कौतुक वाटलं. आणि अगदी तळागाळातल्या वर्गाला पण इंटरनेटचं महत्व समजतं हे बघुन आश्चर्य वाटलं.  कुठली साईट?? सांगतो पुढे ..

आजच्या दिवसात इंटर्नेट जे अगदी तुमच्या खिशात जाउन बसलंय त्याची मुहुर्त मेढ   भारतामधे राजिव गांधी  यांनी रोवली. टेलिफोन्स चं जाळं सगळ्या भारतात पसरवलं . टेलिफोन्स मधुन जितका प्रॉफिट मिळायचा , तो सगळा रिइन्व्हेस्ट करुन भारताच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत टेलिफोन पसरवला. १५०० उंबऱ्यांचं गांव जरी असलं तरी तिथे आज टेलिफोनची सोय आहेच. जागोजागी एस टी डी बुथ उभे राहिले. कुठल्याही गावाला फोन करायचा तर केवळ एसटीडी कोड प्रिफिक्स करुन नंबर फिरवला की झालं . ट्रंक कॉल्स इतिहास जमा झाले. अगदी थोड्याच दिवसात सेल फोन आले.. आणि इंटरनेट  पण अगदी कॉमन झालं आणि   तुमच्या खिशात मोबाइल सोबत  जाउन बसले ते पण समजलंच नाही.

तर काय सांगतोय, ह्या टेलिफोनच्या क्रांती मुळे इंटरनेटची  उपलब्धता खुप सोपी झालेली  आहे सध्या.  सर्फिंग करतांना मला तिन निरनिराळ्या साईट्स सापडल्या नेट वर त्याबद्दल अगदी थोडक्यात लिहितोय इथे.

रिक्षावाल्याची वेब साईट..

पहिली म्हणजे एक चेन्नईचा रिक्षा वाला.. त्याने स्वतःची वेब साईट तयार केलेली आहे. अगदीच क्रुड असलेली वेब साईट आहे, पण एक रिक्षावाला पण आपल्या बिझिनेस साठी इतका कॉशस अन नेट सॅव्ही बघुन गम्मत वाटली. स्वतःचा ब्लॉग बनवुन जाहिरात करावी असं त्याला वाटणं यातच सगळं आलं. आणि भारत २१व्या शतकाच्या वेगाशी सिंक्रोनाइझ होतोय  याची खात्री पटली. वेब साईट खास करुन परदेशी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आहे.

हा रिक्शावाला म्हणतो, मी तुम्हाला दिवसभर टुकटुक मधे बसवुन चेन्नाईला फिरवुन आणिन. जेवायला, क्लबींग, हे तर आहेच,  जर तुम्हाला एका पेक्षा जास्त रिक्षा हव्या असतिल तर त्या पण तो अरेंज करुन देउ शकतो. त्याने आपला इ मेल ऍड्रेस, फोन नंबर सगळं काही दिलेलं आहे.  त्याच्याच वेब साईटवर तो रिक्षावर जाहिरात करायची असेल तर कॉंटॅक्ट करा असंही लिहितोय.. बघा!!! आहे की नाही ग्रेट??

मुंबई डबावाल्यांची साईट

दुसरी वेब साईट ही मुंबईचे डबे वाले यांची. यांना आपलं मार्केटींग व्यवस्थित करता येतं वेब साईट पण अगदी व्यवस्थित डेव्हलप केलेली आहे. मला मजा वाट्ली, ते ’ अ डे विथ डबेवाला’ ही कन्सेप्ट चालु केली आहे. तुम्हाला त्यांच्या बरोबर दिवस भर रहाता येइल. खास परदेशी टुरिस्ट लोकांसाठी ही योजना दिसते राबवलेली.

डबेवाल्यांच्या सिक्स सिग्मा सिस्टीम्स च्य थोबाडीत मारणारी सिस्टीम  मुळे त्यांना बोलावले जाते लेक्चर्स साठी. त्या वेब साईटवर पण अश लेक्चर्स साठी कॉंटॅक्ट करा असं अवाहन करण्यात आलंय. त्यामधे मोठ मोठ्या कंपन्यांची नावं बघुन आश्चर्य वाटुन घेउ नका. माझ्या माहिती प्रमाणे ऑक्सफर्डला पण यांचं लेक्चर झालंय.

मुंबईच्या डबेवाल्यांना ग्लोबल रेकग्निशन आहे. कदाचित म्हणुनच  वेब साईट खुपच चांगली डेव्हलप केलेली आहे.

मेड सर्व्हिस पोर्टल

आणि तिसरी वेब साईट आहे डॉ, मंजु यांची . थोडक्यात त्याला मोलकरणींचं एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज पण म्हणता येइल. यांच्यावर एक लेख लोकसत्ता मधे पण बरेच वर्षापुर्वी आला होता आणि त्याची माहिती पण वेब साईट वर दिलेली आहे. मोठ्या शहरात हाउस मेड वगैरे मिळणं कठीण झालंय.खात्रीची मेड मिळण्यासाठी एक साईट पहाण्यात आली. तिची लिंक देतोय इथे.मेड्स चं पोलिस व्हेरिफिकेशन वगैरे केलेलं असलं की थोडं जास्त सेफ वाटतं.बाहेर गावाहुन मुंबईला आलेल्यांना तर मेड्स वगैरे विश्वासु मिळणं हा एक प्रॉब्लेमच वाटतो म्हणुन त्यांना ही साईट उपयोगी ठरु शकते.

ह्या सगळ्या साईट्स तर ठिकच आहेत, पण मुंबईच्या मुच्छड पानवाल्याची वेब साईट जी आहे तिचा उल्लेख केल्याशिवाय तर हा लेख पुर्ण होऊच शकत नाही. पान म्हणजे काय? पानाचे प्रकार किती? त्यात काय घालतात? असे अनेक प्रश्न परदेशी लोकांना पडतात, त्यांची उत्तरं दिलेली आहेत या साईटवर. अतिशय व्यवस्थित असलेली ही वेब साईट म्हणजे भारतातली पहिली पान वाल्याची साईट असल्याचा तोरा मिरवते.

या  सगळ्या वेब साईट्सच्या क्वॉलिटी बाबत मी काही फारसं बोलणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे,तुम्हाला आवडो वा ना आवडो,  इंटरनेट हळू हळू आपल्या रोजच्या जिवनाचा अविभाज्य अंग होतंय..

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

रोमॅंटीक आयडीयाज..

जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते स्वतःमधला रोमॅंटीक ’किडा’ जिवंत ठेवणे. आता वय कितीही असो.. अगदी १६ ते ७५ रोमॅंटीझम शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक रहातं. या रोमॅंटिक वागणं- म्हणजे केवळ ’तिला’ महागड्या हॉटेलमधे घेउन जाउन खुप खर्च करणे, किंवा फार तर एखाद्या सिनेमाला तिला घेउन जाणे, किंवा साडी , ड्रेस, जिन्स घेउन देणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पुर्ण चुकीचे आहे..  पण खरंच असं असतं कां?? स्त्रियांच्या रोमॅंटीझम च्या कल्पना काय बरं असतात??

एम ऍंड बी मधे कसे मस्त रोमॅंटीक प्रसंग असायचे? तसंच काही तरी आपल्याही बाबतीत घडावं असं प्रत्येकच मुलीला वाटत असतं. लग्न होऊन इतकी वर्ष झालीत म्हणुन काय झालं?? तुमच्या मनातला तो मदनबाण तरुण आहे नां? माझ्या फेवरेट आयडीयाज.. इथे आहेत..

१)तिचा वाढदिवस आहे.. किंवा लग्नाचा वाढदिवस समजा १२ वा… तुम्ही कुठे तरी बाहेर घेउन गेला आहात मे बी शॉपिंग मॉल मधे. एक १२ गुलाबाची सुंदर फुलं घ्या विकत. एका खांबाच्या आड उभे रहा आणि एखाद्या येणाऱ्या माणसाला एक फुल तिला द्यायला सांगा.. आणि म्हणायचं.. हॅपी ऍनिव्हर्सरी.. असे ११ फुलं निर निराळ्या लोकांच्या तर्फे ( ज्या पैकी काही पुरुष काही स्त्रिया आणि एखादं लहान मुलं पण चालेल)  देउन झाले की १२ वं फुल तुम्ही स्वतः तिला द्या.. आणि म्हणा….. ( आता ते पण मीच सांगु कां?)

२)जर लग्न झालेलं नसेल, अजुनही डेटींग करित असाल, तर हाताची झेरॉक्स काढुन त्यावर लिहा .. :तुला हा हात तुला आपल्या हातात आयुष्य भरासाठी   धरुन ठेवायला आवडेल कां?”  आणि तो पेपर स्कॅन करुन तिला इ मेल करा.  तिला म्हणाव, की उत्तर हो असेल तर आपल्या हाताचा ठसा त्यावर काढुन परत  पाठव.

३)तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक जुन्या बाजारातुन विकत घ्या. त्यावर त्या लेखकाची फेक सही स्वतःच  करा ( सहीचा नमुना कुठेही सापडेल ) आणि तिला गिफ्ट रॅप करुन द्या..

४)एक सुंदरशी लव्ह स्टॊरी लिहिणे सुरु करा. मुख्य पात्र तुम्ही दोघंच . ( अगदी रिअल स्टॊरी नको..थोडं काल्पनिक, थोडं खरं) पहिला पार्ट म्हणजे तुम्ही कसे आणि कुठे भेटलात , कशी मैत्री झाली, कसे तुम्ही तिच्या प्रेमात पडलात, आणि तिला सांगतांना तुम्हाला कशी भिती वाटते – कारण तिने नाही म्हंटलं, तर मैत्री पण संपुन जाइल म्हणुन वगैरे वगैरे…. आणि मग तिला पाठवुन द्या.. म्हणा, पुढल्या  भागात काय होणार आहे   ते तुलाच माहिती आहे, म्हणुन तुच  लिहुन पाठव…. :) आणि गोष्ट पुर्ण करुन मला परत पाठव.

५)पर्सनलाइझ्ड मॅग्झिन कव्हर बनवा तिच्या फोटोचं अन तिला इ मेल करा. कसं बनवायचं? शोधा गुगलवर, नाही सापडलं, तर मला विचारा.आणि स्टॊरीचं हेडींग कुठलं?? तर सगळ्यात सुंदर मुलगी…. असं काहीतरी…

६)पंचविस गॅसचे फुगे विकत घ्या. त्या सगळ्यांच्या दोरा एकत्र बांधुन त्याला एक लहानशी कागदाची पाटी लावा.. आय लव्ह यु ची.. हे सगळं सामान ठेवा आपल्या कारच्या डिकी मधे. बाहेर कुठे तरी फिरायला जा.. लॉंग ड्राइव्हला.. समुद्रावर वगैरे… आणि तिला सांगा, की माझी वॉटर बॉटल डीकी मधे आहे ती आणतेस?? अन तिला चावी द्या कारची. ती कारची डिकी उघडेल आणि सगळे फुगे एकदम बाहेर येतील, तुम्ही बनवुन ठेवलेल्या आय लव्ह यु नोट सह..

७)होळीच्या दिवशी.. आम्ही होळी खेळत नाही बॉ.. वगैरे तर नेहेमीच ऐकता तिचं.. या वेळी एक काम करा. दोन पिचकाऱ्या आणुन ठेवा, आणि होळीच्या दिवशी तिच्या नकाराची पर्वा न करता तिला भिजवा.. दुसरी पिचकारी पण तिला सापडेल अशीच ठेवा.. किंवा ती झोपेत असतांना तिला गुलालाने रंगवा.. तिच्या नकळत,

८)बायको असेल ,तर तिची तारिफ करा , इतरांसमोर.. शक्यतो एखाद्या कॉमन पार्टी मधे मित्रांच्या गृप मधे जसे.. ही नां, चिकन बिऱ्याणी मस्त बनवते. अरे अगदी ’लकी मधली’ हैद्राबादी बिर्याणी पण झक मारते हिच्या हातच्या बिर्याणी समोर. अन हे सगळं करतांना तिचा हात हलकेच दाबा.. करेक्ट बॉडी लॅंग्वेज पण महत्वाची असते बरं कां…

९)जर मुलं घरात असतील तर त्यांची सोय करा एखाद्या चांगल्या मित्राकडे.. अन शुक्रवारी अनाउन्स करा.. की………..

१०)एक सुंदरसा बॉक्स घ्या विकत. त्या मधे दर महिन्याला काहीतरी एक गिफ्ट ठेवत जा.. लहानसंच.. पण न चुकता..पैसे नसतिल तर लहानसं चॉकलेटपण चालेल.

११)गर्ल फ्रेंड असेल, तर तिची हॉबी काय ते शोधुन काढा. यासाठी तिच्या मैत्रिणीचा उपयोग होऊ शकतो. त्या हॉबी ला उपयुक्त अशी एखादी वस्तु भेट दिलेली तिला खुप आवडेल.

१२)सकाळी ती उठण्यापुर्वी तिच्या साठी कॉफी बनवुन ठेवा.. आणि ती उठण्यापुर्वीच तिच्या हातात कप द्या आणि मग पहा…. काय होतं ते!

१३)पिलो फाइट.. खास पिलो आणा विकत. पिलो ला छिद्र पाडुन ठेवा.. म्हणजे त्यातली पिसं बाहेर उडतील.पिलो फाइट मधे खुप मजा येते बरं कां.. आणी पिलो फाटली असेल तर अजुनच!

१४)लग्नाचा वाढदिवस आहे?? मग सोपं आहे. तिला ऑफिसच्या जवळ बोलवा, ऑफिस संपायच्या वेळेस, आणि दोघंही एक मेकांना ओळखत नाही, आणि पहिल्यांदाच भेटाताहेत असं  भासवुन -  सरळ एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेल मधे घेउन जा, जिथे एक रुम बुक केलेली असेल ..आणि नंतर पुढे……

१५)तिचा वाढदिवस आहे ?? तिला तिच्या वयाइतके फुलं द्या गुलाबाची. त्यामधे एक प्लास्टीकचं फुल ( अगदी खरं दिसणारं ठेवा) आणि तिला सांगा की शेवटचं फुल टवटवीत राही पर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीन.

१६)गॅसचे फुगे आणा विकत.. तिच्या कपाटात ते फुगे भरुन ठेवा. त्याला एक पेपर लावा.. हॅपी बर्थ डे चा… सरप्राइझ इज द की  ऑफ सक्सेस हे लक्षात ठेवा.

१७)बायकॊ समजा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात असेल, तर तिला सांगा, की मला तुझी खुप काळजी वाटते म्हणुन तुझ्या साठी मी एक बॉडी गार्ड आणलाय, अन तिच्या हातात एक लहानसा टेडी द्या..

१८)तिला वाचनाची सवय आहे?? ती एखादं पुस्तक वाचते आहे कां? तर तिचं जितकं वाचुन झालंय त्याच्या पुढे काही अक्षरांखाली पेन्सिलने मार्क करा, आणि तिला सांगा की सिक्रेट मेसेज आहे त्यात. मग तो काहीही असु शकतो.. सिनेमाची तिकिटं तुझ्या पर्स मधे आहेत वगैरे..  उदाहरणार्थ या वाक्यात मी तुझ्यावर   प्रेम म्हणजे काही भावना नाही  तर मी ते करतो हे म्हणणं एक मोठ कठिण काम आहे..

१९)खेळ.. हा पण एक चांगला ऑप्शन आहे. स्पेशिअली रमी.. किंवा तत्सम पत्त्यांचा खेळ, अर्थात गेम विथ बेट्स… आता ’बेट’ काय ते तुम्हीच ठरवा… :)

२०)तिच्या वाढदिवसाला तिच्या ऑफिसमधे फुलं पाठवा.. सोबतंच चॉकलेट्स पण. तिला सगळ्यांसमोर फुलं आलेले बघुन खुप एंजॉय करता येइल आणि इतर मैत्रीणींवर माझा नवरा बघ कसा माझ्याकडे लक्ष देतो म्हणुन थोडं मिरवता पण येइल.

२१)मुलींना झोपाळ्यावर बसायला खुप आवडतं. तिला फिरायला घेउन जा. एखाद्या बगिच्यात तिला झोपाळ्यावर बसवुन झोका द्या. कितीही वय असो मुली हा खेळ नेहेमीच एंजॉय करतात, आणि जेंव्हा झोपाळ्यावरुन उतरतात तेंव्हा एकदम फ्रेश अन बब्ली असतात… :)

२२)हेअर ब्रश घेउन तिचे केस विंचरत बसा. हे शक्यतो रात्री झोपण्याच्या वेळेस करा.. कमित कमी ३ ते ५ मिनिटे.ती एकदम रि्लॅक्स होईल आणि मग पुढे ….. तुमच्या हातात आहे सगळं.

मेल मधे   वाचलेलं  , मित्रांकडुन ऐकलेलं आणि थोडं अनुभवलेलं  जे काही आहे, ते इथे लिहिलं आहे बरं कां. आणि अजुन काही टिप्स माहिती  असतिल तर इथे लिहा कॉमेंट्स मधे..